ती सावली कुणाची

ती सावली कुणाची?

हळुवार पावलांनी जरी देऊन स्पर्श ओला
झुळुक वाऱ्याची परी पेटवी अनेक ज्वाला
मान वळविता मागे अदृश्य  जाहले  सारे
मग कोवळ्या सुखाची,ती सावली कुणाची?

वाटे उरात चाले जसा आक्रंद भावनांचा
का भासतो असा हा आनंद विकृतीचा
सोडूनि पाश सारे मन बेभान धावणारे
पाऊलखुणा विचारी,ती सावली कुणाची?

ओघ वाढे जिवाला,करी दाह आक्रोश
चहुकडे गर्द काळोख तो एकटा प्रकाश
नयनांना आस येता मी दर्शनास जावे
दृष्टीत येत नाहि,ती सावली कुणाची ?

रोकला श्वास कैसा ठाऊक मला ना माझे
वाटेवर उतरणिच्या अव्यक्त कामना ओझे
भेटता नयन दोघा मज कोण ओळखावे
तरि लागली जिव्हारि, हि सावली कुणाची?

अंतर

उंबरठा अन दारामधले इवलेसे अंतर
प्रवेशाला देती जागा राहुनी समांतर
रावीकिरणे येति घरा जेव्हा प्राचितुनी
वृक्ष ठेवतो पर्णातले अंतर राखुनी
कस्तुरीचा सुगंध बघा कसा मिळाला
मृगाने स्वतःहुन दूर तयाला केला
करकमळांची देठे दुरावति स्वतःला
म्हणून हात देता येतो दुज्या हाताला
मेंदूने जर केली हृदयाशी जवळीक
कसे बरे सुटतील मग प्रश्न ते मार्मिक ?
राहे असेच दोन मनाचे नाते काहीसे
अंतरे राखून उघडतात काही कवडसे

इतकेच मला जाताना ( सुरेश भट )

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सुरेश भट

दोनो ओर प्रेम पलता है

दोनों ओर प्रेम पलता है।
सखि, पतंग भी जलता है हा! दीपक भी जलता है!

सीस हिलाकर दीपक कहता–
’बन्धु वृथा ही तू क्यों दहता?’
पर पतंग पड़ कर ही रहता
कितनी विह्वलता है!
दोनों ओर प्रेम पलता है।

बचकर हाय! पतंग मरे क्या?
प्रणय छोड़ कर प्राण धरे क्या?
जले नही तो मरा करे क्या?
क्या यह असफलता है!
दोनों ओर प्रेम पलता है।

कहता है पतंग मन मारे–
’तुम महान, मैं लघु, पर प्यारे,
क्या न मरण भी हाथ हमारे?
शरण किसे छलता है?’
दोनों ओर प्रेम पलता है।

दीपक के जलने में आली,
फिर भी है जीवन की लाली।
किन्तु पतंग-भाग्य-लिपि काली,
किसका वश चलता है?
दोनों ओर प्रेम पलता है।

जगती वणिग्वृत्ति है रखती,
उसे चाहती जिससे चखती;
काम नहीं, परिणाम निरखती।
मुझको ही खलता है।
दोनों ओर प्रेम पलता है।

मैथिली शरण गुप्त

स्पर्श

तुझा स्पर्श जसा उनाड वारा
तनमनाला विचलित करणारा
सोसाट मिश्किल अदृश्य
तरीही हवाहवासा वाटणारा

तुझा स्पर्श म्हणजे लाटा
येति जाती समुद्री तटा
कितीही आल्या तरी
प्रत्येकीची वेगळीच छटा

तुझा स्पर्श जशी पालवी
झाडाला आलेली नवी
अगदी अलगद कोवळी
हात लावताच उमलावी

तुझा स्पर्श ऊन ग्रीष्माचं
प्रखर तेजस्वी मध्यान्हाचं
जरी रणरणती किरणे तरी
काम करतात चेतवण्याचं

तुझा स्पर्श पावसाच्या धारा
कोवळ्या तनूला भेदणाऱ्या
कधी मंद कधी मुसळधार
पण तरीही सुखावणाऱ्या

तुझा स्पर्श गुलाबी गारवा
एकांतात गायलेला मारवा
किर्रर्र अंधाऱ्या रिक्त राती
उबदार बाहूचा विसावा

तुझा स्पर्श तुझा श्वास
अनुभूती कधी आभास
माझे स्पंदन नि
“ऋतु जा”गवणारा
तुझा स्पर्श माझा ध्यास !!!

त्रिवेणी

धरणी म्हणे हसूनच आभाळाला
कैक दिसात मोकळा श्वास मिळाला
स्वछ प्रकाश आणि पक्षांची गाणी
नदीलाही आलय बघ गोड पाणी
अभाळही हसून हळूच बोलला
कसा काय हा चमत्कार झाला

इसे न समझो कोई चमत्कार
निर्दोशी का हो रहा संहार
हर तरफ एक ही हाहाकार
कैसे करोगे इसका प्रतिकार
क्या होगा इसका कही अंत
जो फैला है ये चारो दिगंत

Don’t worry it will end soon
As bane comes with boon
Stay strong don’t loose heart
End is inevitable of any start
It was a lesson we needed badly
Each one should accept gladly
So enjoy your bun and dalgona
And cry GO CORONA GO CORONA !!

” THERE’S ENOUGH IN WORLD FOR EVERYONE’S NEED
BUT NOT FOR EVERYONE’S GREED “
~ Mahatma Gandhi

कांच

मेरे घर में दो कांच की बोतले है
एक पारदर्शित है
जिसमे मैं हु
मैं दुनिया को और दुनिया मुझे
देख सकती है
और दूसरी रंगीन , अपारदर्शित
उसमे मेरे ख्वाब है
न वो किसीको देखते है
न कोई उन्हें देखता है
साल दर साल रंग और गहरे हो रहे है
और उतने ही अदृश्य
अब तो बरसो बीत गए
मैने खुद उनको देखा नही है
न जाने जिंदा है या नहीं !!

तुम न जाने किस जहा में खो गए

तुम ना जाने, किस जहां में खो गए
हम भरी दुनियाँ में, तन्हां हो गए

मौत भी आती नहीं, आस भी जाती नहीं
दिल को ये क्या हो गया, कोई शय भाती नहीं
लूट कर मेरा जहां, छूप गए हो तुम कहाँ
तुम ना जाने, किस जहाँ…

एक जान और लाख गम, घुट के रह जाए ना दम
आओ तुमको देख लें, डूबती नज़रों से हम
लूट कर मेरा जहां, छूप गए हो तुम कहाँ
तुम ना जाने, किस जहाँ…

~ साहिर लुधियानवी

रात आँखों में ढली पलकों पे जुगनूँ आए

रात आँखों में ढली पलकों पे जुगनूँ आए
हम हवाओं की तरह जाके उसे छू आए

बस गई है मेरे अहसास में ये कैसी महक
कोई ख़ुशबू में लगाऊँ तेरी ख़ुशबू आए

उसने छू कर मुझे पत्थर से फिर इंसान किया
मुद्दतों बाद मेरी आँखों में आँसू आए

मेरा आईना भी अब मेरी तरह पागल है
आईना देखने जाऊँ तो नज़र तू आए

किस तकल्लुफ़ से गले मिलने का मौसम आया
कुछ काग़ज़ के फूल लिए काँच के बाजू आए

उन फ़कीरों को ग़ज़ल अपनी सुनाते रहियो
जिनकी आवाज़ में दरगाहों की ख़ुशबू आए

बशीर बद्र

संवाद

संवाद हा फक्त एकाने दुसऱ्याशी बोलणे आणि त्याने त्याचे उत्तर देणे , इतकाच असतो का ?
का माणूस माणसाशी न बोलता पण संवाद होतात ?
आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी आपण तो व्यक्ती जवळ नसतानाही संवाद साधू शकतो.
पत्राने , दूरध्वनी ने आणि अनेक रीतीने जिथे तंत्रज्ञान पोहोचले आहे . पण हे सगळं जेव्हा अनुकूल नसतं ,तेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाशी संवाद साधू शकतो ?
हो नक्कीच , मनातून मनापर्यंत पोहोचणारी भाषा , किंवा आपल्या एखाद्या कामाला नकळत मिळालेली दाद , जी थेट तुमच्यापर्यंत नाही आली तरी ती तुम्हाला कळली , दिसली आणि उमजली , तो पण एक संवाद झालाच , नाही का !

Design a site like this with WordPress.com
Get started