करशील का सांग ना

करशील का सांग ना
ह्या मनाच्या वाहत्या निशब्द झऱ्याला रोक ना
अन फुलांच्या पाकळ्याचा तो सडा सांभाळ ना
आसमंती इंद्रधनुष्य का असा तुटका दिसे
रंग त्यातील तू मला समजावून सांग ना

उत्तरे ही वाट बघती प्रश्न थोडे टाक ना
जे कधी होते घडाया डाव ऐसे मांड ना
वादळातच वाहणारे भाव हे वेडे पिसे
त्यास थोडे ओंजळीतच सावरया सांग ना

शुष्क मी धरणी तू घेऊनि ये जलधारांना
सांजसमयी मावळुनी पुनः नव्याने पहाटना
ठेवले आहे जपूनि काही पिंपळ पानाचे ठसे
आठवणीतून तुही काही ठेवल्याचे सांग ना

नको माणिकमोती जवळी असोत भावना
नको फुलांच्या बागा शब्दसुमने आहेत ना
जे जे हवे आहे मला ते ते अगदीच तैसे
शेवटचे मजसाठी करशील का सांग ना

मिर्ज़ा ग़ालिब

मेहरबाँ हो के बुला लो मुझे चाहो जिस वक़्त
मैं गया वक़्त नहीं हूँ कि फिर आ भी न सकूँ

ज़ोफ़ में ताना-ए-अग़्यार का शिकवा क्या है
बात कुछ सर तो नहीं है कि उठा भी न सकूँ

ज़हर मिलता ही नहीं मुझ को सितमगर वर्ना
क्या क़सम है तिरे मिलने की कि खा भी न सकूँ

कोई दिन गर जिंदगांनी(मिर्झा गालिब )

कोई दिन गर ज़िंदगानी और है

अपने जी में हम ने ठानी और है

आतिश-ए-दोज़ख़ में ये गर्मी कहाँ

सोज़-ए-ग़म-हा-ए-निहानी और है

बार-हा देखी हैं उन की रंजिशें

पर कुछ अब के सरगिरानी और है

दे के ख़त मुँह देखता है नामा-बर

कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है

क़ाता-ए-एमार है अक्सर नुजूम

वो बला-ए-आसमानी और है

हो चुकीं ‘ग़ालिब’ बलाएँ सब तमाम

एक मर्ग-ए-ना-गहानी और है

क्षण

क्षण हसरे ,नाचरे
कधी मऊ कधी बोचरे
क्षण थोडके क्षण अफाट
चाकावरी जस फिरत रहाट
क्षण शरदाच चांदण
जणू आभाळाला कोंदण
क्षण नाजूक क्षण कणखर
नारळाला जसा असे पाझर
क्षण अगणित भले चांगले
स्मृती होऊनि मेंदूवर गोंदले
क्षण आवाज कधी आक्रोश
येतो वाऱ्याला जसा आवेश
क्षण जे वाटले निरंतर
तेचि होऊ पाहिले भंगुर !!

वेळ

कुणी मला एकदा विचारल
” तू फावल्या वेळात काय करते ग ?”
थोडा वेळ थांबून मी म्हंटल
“मी माझ्याच रचलेल्या कविता वाचते
आपल्या मनात असंख्य विचारांनी घर केलयं
हे आठवून मनातच , कधी रडते ,कधी हसते
कधी भांबावून जाते तर कधी भुरळून जाते .
आपल्या एकांतात जे शब्द सुचतात
ते निव्वळ योगायोग किंवा
एक काव्यरचना नव्हे तर
आयुष्याची जमा पुंजी असते .
जे भाव जगापुढे मांडता आले नाही
किंवा मांडूनही ते कुणाला कळले नाही
तर त्यांना माझ्या कविता आसरा देतात .
आपल्या कुशीत घेऊन शांत करतात .
म्हणूनच फावल्या वेळात मी माझ्याच कविता वाचते
खरंतर मी कवितेच्या कुशीत जाते . “

ध्यास

बेधुंद मनात आलेल्या लहरींना किनारा नसावा
स्वछंद विचाराना वाहणारा खुळा वारा असावा

जमिनीवरून चालताना आभाळाचा ध्यास घ्यावा
मातीत रुजलेल्या बियाणांना थोडा ओलावा द्यावा

मनातील पाखराला सोन्याचाही पिंजरा नसावा
आकाशात झेप घेताना घरट्याच्या विचार असावा

मेघगर्जनेत कधीतरी अभाळाचा क्रोध दिसावा ?
पावसाच्या सरींना कधी भिजण्याचा हक्क मिळावा ?

आठवणीं गोळा करायला भेटीना मोकळा मार्ग द्यावा
दुरून का होईना आपल्या आपुलकीचा स्पर्श असावा !!

अंधार

मी अंधाराला घाबरत नाही
मला भीती आहे ती
एका ठिकाणी बसून राहायची
स्तब्ध , निशब्द , निर्विकार !!
कारण अंधारात चाचपडताना
आपल्याच घरातले अंदाज चुकतात
मग धडपड , तोडफोड आणि होणाऱ्या इजा
मला त्याची भीती आहे !
मी अंधाराला घाबरत नाही
मला भीती आहे ती
त्यातून आलेल्या रिक्तपणाची !!

संघर्ष

मेरे संघर्ष से मेरा पुराना है नाता
न मैं उसे छोड़ू न वो मुझे है छोड़ता

बचपन में जब उंगली पकड़ चलना सीखा
गिरने पर भी हजार बार उसने मुड़कर न देखा
बोला उठो अपने आप यही है अपना रिश्ता
न मैं उसे छोड़ू न वो मुझे है छोड़ता

न उसे इनकार है मेरे रोने से
नही वो रूठा है मेरा अस्तित्व खोने से
वो अटल , अस्थिर हर हाल में साथ रहता
न मैं उसे छोड़ू न वो मुझे छोड़ता

बचपन में ही साड़ी का शौक मुझे चढ़ा
वो तब मेरे रास्ते में आकर नही अड़ा
कहा घूंघट में दम मत घुटने देना
न मैं तुम्हे छोड़ू न तुम मुझे छोड़ना

साड़ी पर भी उठते है लांच्छन कितने
रंग छिडक दिखाये है अपने जमाने ने
फिर एक बोतल पानी वो मेरे मुह पर मारता
न मैं उसे छोड़ू न वो मुझे छोड़ता

अब घुटनो तक आती है बचपन की साड़ी
दो से लेकर तीन की है ये बाबा गाड़ी
फिर भी आज हाथ मेरा वो थामता
न मैं उसे छोड़ू न वो मुझे छोड़ता

बहती हुई आंखे वो नही पोछता
राह के कांटो को वो नही फेकता
न ठोकर से बचाता नही गिरने देता
न बहलाता न सहलाता
न दानव न भगवान बनता
बस एक सच्चे हमसफर की तरह
कभी न छोड़ने के वादे को साथ लेकर
मेरी आवाज को गले लगाकर
मेरी रूह को जीवित रखता
मेरा संघर्ष बेवफा नही
वो मुझे कभी नही छोडता!!

बोगदा

जाणाऱ्या रस्त्यातला अंधार
चलित असून वाटे निर्विकार
प्रकाशाचा टिपूस दूरवर नाही
कोठवर काळोख पत्ता नाही
स्पर्श चाचपडत एकमेकांचे
क्षण मोजत राहता अंधाराचे
येईल तो काळोखाला भेदून
चेतवून जाईल त्या उर्जेतून
वाट पाहणे व्यर्थ !
संपता संपत नाही हा अंधार ?
रात्रीच्या प्रवासात कळतच नाही
किती बोगदे केले पार

कातरवेळ

कुण्या एका खिन्न कातरवेळी
मालवतो दिवा उरते काजळी
वाटेवर अंधाराला प्रश्न माझा
पुढे किती खळगे नि खाचा
उजेडाची वाट शोधता शोधता
तुझ्यात देतो का थोडी शांतता !!

Design a site like this with WordPress.com
Get started