निरोप

शून्याचा अर्थ शोधता शोधता शून्य होऊन बसतो ,भल्या मोठ्या गोंधळात शांत वादळ झेलतो  लोप पावतील एके दिवशी सारे मनातील मनोरे ,चांदण्यांच्या झोळीसाठी सूर्य रोज झुरत नसतो  कळत असतं अंधाराला त्याला सुद्धा डोळे आहेत झापड उघडुन मात्र तो उजेड कधीच बघत नसतो  शोधत असता मोती शब्दांची माळ पेरण्याकरता ,कविता अवतरते तोवर काळ  निसटून जातो  दृष्टीलाही दिसत नाही स्पर्शालाही मिळत नाही अस्तित्व …

वाळवी

घराच्या कोपऱ्यात ठेवलेली एक शोभिवंत बाहुली एके दिवशी अचानक जमिनीवर कोसळली लाकडाची ती छिन्न विच्छिन्न झाली !!  जोवर होती नवी तोवर सगळ्यांनाच हवी पण बरेच दिवसात फुटली नव्हती पालवी कळलच नाही आत वाढत होती  वाळवी!!

जन्म

ती बघ एक लाट आताच येऊन परत गेली ,पायाखालची वाळू गच्च ओली करून गेली जोवर ती कोरडी होते तोवर थोडा वेळ थांब  नाव दिसतेय बघ दुरून येणारी ,कदाचित तीच असेल मला घेऊन जाणारी ,ती जवळ येईस्तोवर तरी थांब  शिंपले बघ किती जमले हातात ,दिसेल खरा मोती एखाद्या शिंपल्यात ,एक तरी मोती हातात येईस्तोवर थांब  गोष्टी – गाणी झाल्या , खाऊन – …

स्वप्न

हळूच रोज येत अलगद खुणावत  फिरतय सतत हात ठेवून पोटाशी  करमत नसेल कदाचित एकटेपणात  जमलच नसेल उन वारा पावसाशी  हवं असेल काहीतरी वेगळच जठरात  रोज येऊन बसतय एकाच कोपऱ्याशी  कधी खुणावत गोंधळात वेड्यागत  कधी बडबडत एकांतात स्वतःशी  कसं सांगावं नको थांबू उंबरठ्यात  मीही उभी आहे झोळी घेऊन दाराशी सगळच निसटतय कोरड्या वाळुगत  हाती फक्त राहतय …

शांत घरात…

शांत घरात दारं खिडक्या पण शांत होतातकुणी कुणाशी संवाद साधत नाहीमनातल्या मनात कुजबुजत असतात शांत घरात भांड्याचा पण आवाज नसतोत्याला हलवणार कोण आणि ठेवणार कोणएका वाटीचा दुसरीशी काही संबंध नसतो शांत घरात असते एक इच्छा आणि आशादारं वाजतील, भांडी पडतील, भिंती हलतीलपण दिवस मावळून त्याला येते ति फक्त निराशा शांत घरात रहातो एक एकटा कोपरास्वतःशी …

उरले काही?

दारात उभारल्यावर जाणवल उंबराठा आता मोठा झाला आहे!नजर वर करून बघताना जाणवलं दृष्टी आता धूसर झाली आहे!आरशात न्याहळताना जाणवल काळीज खूपच शांत झालय!!घराच्या भिंतीकडे नजर वळवल्यावर जाणवलं ऐकणारे कान आता दुरावाले आहे!!कागदावर लिहिताना जाणवल, शब्द आता कोरडे झाले आहेत!!आयुष्यात दिसणाऱ्या प्रश्नाकडे बघताना जाणवल, उत्तर आता संपली आहे!!

कवाड

थांबतो नभात माझ्या ,चंद्र आसुसलेलाअगणित नक्षत्रातुंनी तो वेगळाच भासला!! सुर लागतो वेगळा अन गीत होते आगळेका असे होते अचानक त्या कळे ना मज कळे!! डाव होते ओळखीचे, पण अर्थ नाही लागलादेह होते मानवी पण व्यर्थ जन्म जाहला!! होई हा काळोख का रे भेटवाया बघ तुला?टाकुनी ओझे किती ते सूर्य का रे संपला? पालवी येई उदयाला …

जगतो तरीही जगतो का?

रोज रोजची कामे सारीधकाधकीचे जीवन अपुलेशेवटची ही धकधक आहेअसे कुणाला कळते का? जगलो केव्हा जीवनात ह्याआठवून पहावे रोज जराजगण्यासाठी जन्म घेतलामरण्यासाठी जगतो का? हाती असावे पोटापुरतीअशीच असते मनी कामनाहात पसरूनी चहू कडेखळगी तरी भरतो का? मिळते काही सुटते काहीउरते काही जळते काहीजळून तरीही थोडे थोडेजगण्यापुरते उरतो का? हाच असावा अंत अपुलाहेचि असावे द्वार अखेरउभा ठाकुनी …

कोरडा पाऊस

नेहमीच वेळ साधून येतात असे नाहीनेहमीच कोसळतात असेही नाहीसगळेच पावसाळे भिजवून जात नाहीकाही घेऊन जातात कवेत आणिआपल्याच अंगणातल पाणीनेहमीच तळे साठवत नाहीएक एक सर जाते निघूनदूर कुठेतरी रानाला भिजवूनरानातले तुषार घरात देत नाहीजातांना उरतात कोरडी उन्हेंवादळ देऊन अनावधानानेपापण्यांचा कडा मात्र कोरड्या सोडत नाही!!

Design a site like this with WordPress.com
Get started